देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली, पवारांचा खोचक टोला

Sharad Pawar on CM : शक्तीपीठ महामार्गाला (Shaktipeeth Expressway) होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी दिली. तसेच शक्तीपीठ महामार्गावरून फडणवीसांनी यामध्ये राजकारण आणाल तर याद राखा, असं विरोधकांना ठणकावलं होतं. यावर आता शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.
री रिलीज होणार सुपरहिट ‘उमराव जान’; प्रीमियरमध्ये ‘हे’ स्टार्स लावणार हजेरी
सातारा येथे आज शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शक्तीपीठ महामार्गाविषयी विचारले असता ते म्हणाले, मला शक्तीपीठ महामार्गाचा विषय समजून घ्यायचा आहे. मी कोल्हापूरच्या लोकांशी बोलेन. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना याबद्दल माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. याच दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या याद राखा या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच आता आमचं कसं काय होणार, अशी मिश्कील प्रतिक्रियाही दिली
मोदी सरकारचा मोठा निर्णय, टरबुजाच्या बियांची आयात आता बंद; कुणाचा होणार फायदा?.
पवार पुढे म्हणाले, कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी त्याची गरज आणि परिणाम समजून घेणं गरजेचं असतं. जर स्थानिक शेतकऱ्यांची जमीन घेतली जात असतील, त्यांची बाजू ऐकणे आवश्यक आहे हा प्रकल्प काय आहे? हे मी आधी समजून घेईन. शेतकऱ्यांसह त्या भागातील लोकप्रतिनिधी जे जाहीरपणे बोलत आहेत, त्यांची मतं समजून घ्यावे लागतील. मी कधीही विरोधासाठी विरोध करणार नाही, असं ते म्हणाले.
हिंदीसक्ती बाबत विचारले असता पवार म्हणाले की, पाचवीपर्यंत हिंदी भाषा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. या ठिकाणी मातृभाषा हीच महत्वाची असली पाहिजे. त्यानंतर पाचवीच्या नंतर पुढं जे काही करायचं असेल त्याचा निर्णय कुटुंबातले लोक घेतील त्याला आमचा विरोध नाही.
भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर शरद पवार म्हणाले, भास्कर जाधव मला जवळून माहिती आहेत. त्यांच्या विचारात स्पष्टता आहे. एखाद्या गोष्टीवरुन नाराजी असतील की नाही मला माहिती नाही. पण विधीमंडळात भास्कर जाधव यांचं योगदान उत्तम आहे. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात. एखाद्या गोष्टीवर ते रागावले असतील पण तत्व ते कधीच सोडणार नाहीत, असं पवार म्हणाले.